राजवाडे मंडळाविषयी थोडेसे...

भारत इतिहास संशोधन मंडळातील पदाधिका-यांशी मतभेद झाल्यानंतर इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी पुणे सोडून धुळे गाठले. आपल्या सव्वीस वर्षांच्या वास्तव्यात त्यांनी इतिहास संशोधनाचे काम केले. या कार्यकाळात त्यांनी इतिहास आणि संपूर्ण साहित्य विश्वाला दिशा देणा-या ग्रंथांची निर्मिती केली. 31 डिसेंबर 1926 रोजी इतिहासाचार्य राजवाडे यांचे निधन झाले. त्यांनी संशोधन क्षेत्रात केलेले काम अखंडितपणे सुरू राहावे म्हणून त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बोलावलेल्या सभेतच त्यांच्या अनुयायांनी इतिहासाचार्य राजवाडे संशोधन मंडळाची स्थापना केली. राजवाडे यांनी जमविलेले ऐतिहासिक दस्तऐवज, ग्रंथसंपदा जतन करून ते संशोधन व संशोधकांना उपलब्ध करून देण्याचे काम सुरू केले. आजही ते कार्य अत्यंत उत्स्फूर्तपणे सुरू आहे